मुंबई, ठाण्यातील २,३०० झाडांमधून काढले ६,१०० खिळे, ‘आंघोळीची गोळी’चा स्तुत्य उपक्रम

मुंबई, ठाण्यातील २,३०० झाडांमधून काढले ६,१०० खिळे, ‘आंघोळीची गोळी’चा स्तुत्य उपक्रम
Spread the love

मुंबई : सजीवसृष्टीतील प्रत्येकाला स्वत:चे असे एक अस्तित्व आणि महत्त्व आहे. निसर्गनिर्मित प्रत्येक घटक हा एकमेकांवर अवलंबून आहे. त्यामुळे ही साखळी जर ढासळली तर त्याचा परिणाम निसर्गावर होत असतो. झाडांची संख्या घटल्याचा परिणाम कमी आणि अनियमित पावसाने आपल्याला दाखवून दिलाय. त्यामुळे निसर्गाचा समतोल तसेच त्याची निगा राखणे हे आपले कर्तव्य आहे. याच जाणिवेतून आंघोळीची गोळी ही संस्था प्रेम, बंधुभाव, त्याग आणि बचत या तत्वांवर काम करते. त्यांच्या खिळेमुक्त झाडं या सामाजिक चळवळीत रुपांतर झाले असून आतापर्यंत २,३०० झाडांना ६,१०० खिळ्यांपासून मुक्त करण्यात आले आहे.

सध्या जंगल आणि मनुष्यांचे भांडण सुरु आहे. एखादे झाडं पडलं तर झाडाला शत्रु मानलं जात पण प्रत्यक्षात आपणचं त्याला जबाबदार असतो हे विसरतो. झाडांनाही भावना असतात हे डॉ. जगदीश चंद्र बोस यांनी आपल्या संशोधनात समोर आणले आहे. वनस्पतींचेही स्थलांतर होत असते हे पर्यावरणतज्ञांनी पटवून दिले आहे. असे असताना झाडे देखील जीवसृष्टीचा भाग आहेत हे माणसांच्या मनात ठासणे गरजेचे आहे. प्रत्येक सजीवाला भावना असतात. आपल्याला कोणी दगड मारला किंवा खरचटलं तर खूप वेदना होतात. इजा झालेल्या ठिकाणाहुन रक्त बाहेर पडल्यास आणखी जळजळ होते. वनस्पतींचं दुखणंही यापेक्षा वेगळं नसतं. पण मनुष्यातर्फे रस्त्यांवरील झांडावर सर्रास खिळे ठोकून त्यावर बॅनर लावले जातात. झाडांवरून लाईट्स फिरवल्या जातत. सुशोभिकरणाच्या नावाखाली झाडांना इजा पोहोचवली जाते. झाडे ही माणसांप्रमाणे ती बोलू शकत नाहीत. त्यामुळे झाडांवर खिळे ठोकण्याचे प्रमाण दिवसागणिक वाढतच चालले आहे.

Admin

Admin

9909969099
Right Click Disabled!